Saturday, 4 April 2015

अमंगळपणा कधी दूर होणार?

दीपत्कार
October 26, 2014 at 2:24pm ·
भारतीय शास्त्रज्ञ मंगळयान मोहीम यशस्वी करून अवकाश क्षेत्रात सुवर्णाक्षरी नोंद करण्याजोगी कामगिरी करत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय समाज अजूनही जातीव्यवस्थेच्या जंजाळातच गुरफटून पडल्याचे भीषण वास्तव वेळोवेळी समोर येणार्या दलितांच्या हत्याकांडाने अधोरेखित होते. खैरलांजी, सोनई, खर्डा आणि आता पाथर्डी ही यादी न संपणारी. पृथ्वीचे गुरूत्वाकर्षण भेदून अवकाशक्षेत्रात मारलेली भरारी कौतुकास्पदच पण त्याचबरोबर जातिभेदाचा चक्रव्यूह अजूनही भेदता आलेले नाही हे ही तितकेच जळजळीत प्रखर सत्य. वर्णव्यवस्था, आर्थिक विषमता, सामाजिक विषमता या समस्या जेव्हा मुळासकट उखडल्या जातील तोच खरा 'मंगळ'दिन.
32 people reached

No comments:

Post a Comment