Saturday, 4 April 2015

स्वागतार्ह बाब

दीपत्कार
October 28, 2014 at 1:27pm ·
यंदाच्या दिवाळीत त्यामानाने आवाजी फटाक्यांची संख्या (काही नियमित अपवाद वगळता ) कमी झाली आणि शोभेच्या फटाक्यांची संख्या वाढली. त्यामुळे ध्वनिप्रदूषण थोड्या प्रमाणात का होईना कमी झाले परंतु वायुप्रदूषणात मात्र वाढ झाली. वास्तविक दिव्यांचा सण म्हणून साजरा होणार्या या सणाला मागील काही वर्षांपासून सातत्याने प्रदूषणांचे गालबोट लागत आहे. यामुळेच दिवाळी सणात मुंबईबाहेर जाऊन दिवाळी सुट्टी पर्यटनस्थळी घालवण्याचा कल वाढतोय. तसेही रोजच्या जीवनात मुंबईकरांना ( किंबहुना मुंबईसारख्या शहरातील नागरिकांना ) वेगवेगळी प्रदूषणे चुकलेली नाहीत. सणासुदीच्या काळात त्यांचे प्रमाण वाढते इतकेच. वृत्तपत्रांतून , वृत्तवाहिन्यांतून वेळोवेळी त्याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध होतात, प्रबोधनपर संदेशही दिला जातो. परंतु नाही ' कळते पण वळत नाही ' अशी मनोवृत्ती असलेल्यांकडून प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टीने पावले पडताना दिसत नाहीत. उलट आहे त्या प्रदूषणांत भरच पडत जाते. ' स्वच्छ भारत' अभियानांतर्गत प्रदूषणमुक्त भारत मोहीम राबवण्यावर भर द्यावा. त्यायोगे प्रदूषणांचे दुष्परिणाम नागरिकांच्या मनावर सातत्याने बिंबवण्यात यावे. त्याचा पुढे जाऊन सकारात्मक परिणाम होईल हीच अपेक्षा. आणि मग खर्या अर्थाने दिवाळी हा सण मुंबईकर कुटुंबियासमवेतच दिव्यांची आरास करून साजरा करतील

No comments:

Post a Comment