पत्कार
October 31, 2014 at 10:37pm ·
देवाचिये द्वारी । उभा क्षणभरी ।
नुकतेच मुंबईतील दोन प्रसिद्ध मंदिरात जाणे झाले. दोन्ही मंदिरात जाताना खणानारळाची ओटी म्हणून आपल्याकडचेच ताट घेण्याचा विक्रेत्यांचा आग्रह (?) आणि ते घेतल्यास पादत्राणे सांभाळण्याची तयारी दाखवली जात होती. तेही बरोबर आहे कारण दर्शन घेतानाच पादत्राणांकडे लक्ष असते. रांगेत थोडा वेळ गेल्यानंतर प्रत्यक्ष देवींचे दर्शन गर्दीमुळे ओझरतेच घेता आले. देवीसाठी आणलेले ओटीचे ताट पुजार्यांनी निर्विकार भावनेने घेऊन मानवल्यासारखे करून परत दिले.
संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेच आहे,
देवाचिये द्वारी । उभा क्षणभरी ।
तेणे मुक्ती चारी । साधियेला ॥
म्हणजे क्षणभर जरी देवाच्या द्वारी गेलो तरी मोक्ष मिळेल. ज्ञानेश्वरांचे हे बोल जणू सर्वार्थाने खरे करण्याचा चंगच सुरक्षारक्षकांनी बांधला असावा. त्यामुळे क्षणभरच दर्शन घेऊन पुढे सरकण्यात शहाणपण असते. नाहीतर सुरक्षारक्षकांचा ' पुढे चला ' हा मंत्रघोष चालू असतो. हा एक प्रातिनिधीक अनुभव. पण तुम्ही कुठल्याही मंदिरात ( प्रसिद्ध ) गेलात तर थोड्याफार फरकाने हाच अनुभव येतो. गणेशोत्सवातील प्रसिद्ध राजाच्या दरबारीसुद्धा तसेच. एकूणच कुठल्याही मंदिरात गेलात तर श्रद्धेचा बाजार मांडलेला आढळेल. पूजेच्या ताटापासून ते प्रसादापर्यंत मनमानी किंमत आकारली जाते. भाविक देवासाठी ती मोजायला तयार असतात. कारण त्यांच्यामते देवाच्या दारी घासाघीश कशाला करा? ' देऊळ ' चित्रपटात यावरच विनोदी ढंगाने कोरडे ओढले आहेत.
नित्यनेमाने ठराविक मंदिरात ठराविक वारी जाणारे भाविक बरेचजण आहेत. त्यांच्या भक्तीभावाविषयी आदर आहे. परंतु प्रश्न असा पडतो या भाविकांना मनाजोगते दर्शन मिळते का?
श्रद्धा जरूर असावी पण अंधश्रद्धा असू नये हे माझे प्रामाणिक मत!
October 31, 2014 at 10:37pm ·
देवाचिये द्वारी । उभा क्षणभरी ।
नुकतेच मुंबईतील दोन प्रसिद्ध मंदिरात जाणे झाले. दोन्ही मंदिरात जाताना खणानारळाची ओटी म्हणून आपल्याकडचेच ताट घेण्याचा विक्रेत्यांचा आग्रह (?) आणि ते घेतल्यास पादत्राणे सांभाळण्याची तयारी दाखवली जात होती. तेही बरोबर आहे कारण दर्शन घेतानाच पादत्राणांकडे लक्ष असते. रांगेत थोडा वेळ गेल्यानंतर प्रत्यक्ष देवींचे दर्शन गर्दीमुळे ओझरतेच घेता आले. देवीसाठी आणलेले ओटीचे ताट पुजार्यांनी निर्विकार भावनेने घेऊन मानवल्यासारखे करून परत दिले.
संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेच आहे,
देवाचिये द्वारी । उभा क्षणभरी ।
तेणे मुक्ती चारी । साधियेला ॥
म्हणजे क्षणभर जरी देवाच्या द्वारी गेलो तरी मोक्ष मिळेल. ज्ञानेश्वरांचे हे बोल जणू सर्वार्थाने खरे करण्याचा चंगच सुरक्षारक्षकांनी बांधला असावा. त्यामुळे क्षणभरच दर्शन घेऊन पुढे सरकण्यात शहाणपण असते. नाहीतर सुरक्षारक्षकांचा ' पुढे चला ' हा मंत्रघोष चालू असतो. हा एक प्रातिनिधीक अनुभव. पण तुम्ही कुठल्याही मंदिरात ( प्रसिद्ध ) गेलात तर थोड्याफार फरकाने हाच अनुभव येतो. गणेशोत्सवातील प्रसिद्ध राजाच्या दरबारीसुद्धा तसेच. एकूणच कुठल्याही मंदिरात गेलात तर श्रद्धेचा बाजार मांडलेला आढळेल. पूजेच्या ताटापासून ते प्रसादापर्यंत मनमानी किंमत आकारली जाते. भाविक देवासाठी ती मोजायला तयार असतात. कारण त्यांच्यामते देवाच्या दारी घासाघीश कशाला करा? ' देऊळ ' चित्रपटात यावरच विनोदी ढंगाने कोरडे ओढले आहेत.
नित्यनेमाने ठराविक मंदिरात ठराविक वारी जाणारे भाविक बरेचजण आहेत. त्यांच्या भक्तीभावाविषयी आदर आहे. परंतु प्रश्न असा पडतो या भाविकांना मनाजोगते दर्शन मिळते का?
श्रद्धा जरूर असावी पण अंधश्रद्धा असू नये हे माझे प्रामाणिक मत!
No comments:
Post a Comment